मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रीयं बुध्दिमतां वरिष्ठम् |
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ||
अनुष्टुप छंदामध्ये बुधकौशिक ॠषी यांनी रामरक्षा या स्तोत्रात केलेले हे हनुमान यांचे वर्णन आढळते. वायुप्रमाणे गतीमान व ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला असा कपिश्रेष्ठ म्हणजे रामभक्त हनुमान असे काहीसे हे वर्णन आहे.
आजपर्यंत खुप वेळा खुप ठिकाणी मारुति राया यांचा विविध ठिकाणी उल्लेख आठळतो. जे सहा चिरंजीव सांगितले जातात त्यामध्ये देखिल मारुति रायांचे एक नाव सापडते. स्वत:च्या अपरिमित शक्तिसाठी व शौर्यासाठी मारुतिराया यांचे महत्व विशेष मानले जातात. रावणाच्या अपरिमित साम्राज्यातून अत्यंत कुशलतेने सीतामातेचा शोध यांनी केला व आदर्श भक्ताचे उदाहरण घालून दिले.केवळ भक्ति भावनने पाहिले जाणारे हे मारूती रूप ज्यांनी बदलले व पुराणतील मारुति राया नियमित जीवनात उतरवले ते म्हणजे ज्याना मारुति चे अवतार मानले जाते ते म्हणजे राम नामाची पताका हातात घेऊन अखंड भारतभर शक्तिच्या उपासनीची सुरुवात करणारे समर्थ रामदास स्वामी होय.
हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर या समर्थांच्या कार्यावर प्रकाश टाकून शक्ति ची उपासना आता सुरु करणे हे खरे हनुमान जयंती चे सार्थक म्हणू शकतो.
भारतभर मारुति मंदिर स्थापन करुन शक्तिची पूजा समर्थानी सुरु केली. याचे कारण येवढेच होते की समर्थाना एक सबल आणि समृद्ध राष्ट्राची अपेक्षा होती, ज्यासाठी एक समर्थ आणि शक्तिने युक्त असलेल्या नविन पीढीची गरज होती, म्हणून शक्ति उपासना सुरु झाली.ज्या शक्ति उपासनेमध्ये सूर्यनमस्कारांना विशेष महत्व होते, कारण स्वत: समर्थ १२०० सूर्यनमस्कार घालत.
आणि आजही हे विचार तेवढेच महत्वपूर्ण आहेत जेवढे त्यावेळी होते, कारण सगळ्या गोष्टी केवळ मजेतआणि हसण्यात घेणा-या या पीढीने प्रत्येक उत्सव त्याच महत्व शास्त्र समजून घेऊन ते साजरे करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण अज्ञानाच्या स्वैर सागरात बुढणारी ही ज्ञानरूपी नौका पुन्हा किनारी लावायची असेल तर आपणास आपली पुराणातील सुधारीत गलबत घेऊन पुन्हा उतरावे लागणार. कारण "शास्त्र" हे दुधारी शस्त्र आहे , ज्याचा वापर महत्वचा आहे आणि आपणास तेच समजल पाहीजे.
शक्ति आणि बुद्धि यांचा एकत्रित मेळ असलेल्या मारुती रायांचे स्मरण करुन पुन्हा एकदा ही पवित्र भूमी सुजलाम् सुफलाम् करण्याचा संकल्प आपण सोडूया हेच योग्य ठरेल.
||जय श्रीराम|| ||जय भारत||
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् शरणं प्रपद्ये ||
अनुष्टुप छंदामध्ये बुधकौशिक ॠषी यांनी रामरक्षा या स्तोत्रात केलेले हे हनुमान यांचे वर्णन आढळते. वायुप्रमाणे गतीमान व ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला असा कपिश्रेष्ठ म्हणजे रामभक्त हनुमान असे काहीसे हे वर्णन आहे.
आजपर्यंत खुप वेळा खुप ठिकाणी मारुति राया यांचा विविध ठिकाणी उल्लेख आठळतो. जे सहा चिरंजीव सांगितले जातात त्यामध्ये देखिल मारुति रायांचे एक नाव सापडते. स्वत:च्या अपरिमित शक्तिसाठी व शौर्यासाठी मारुतिराया यांचे महत्व विशेष मानले जातात. रावणाच्या अपरिमित साम्राज्यातून अत्यंत कुशलतेने सीतामातेचा शोध यांनी केला व आदर्श भक्ताचे उदाहरण घालून दिले.केवळ भक्ति भावनने पाहिले जाणारे हे मारूती रूप ज्यांनी बदलले व पुराणतील मारुति राया नियमित जीवनात उतरवले ते म्हणजे ज्याना मारुति चे अवतार मानले जाते ते म्हणजे राम नामाची पताका हातात घेऊन अखंड भारतभर शक्तिच्या उपासनीची सुरुवात करणारे समर्थ रामदास स्वामी होय.
हनुमान जयंती च्या शुभ मुहूर्तावर या समर्थांच्या कार्यावर प्रकाश टाकून शक्ति ची उपासना आता सुरु करणे हे खरे हनुमान जयंती चे सार्थक म्हणू शकतो.
भारतभर मारुति मंदिर स्थापन करुन शक्तिची पूजा समर्थानी सुरु केली. याचे कारण येवढेच होते की समर्थाना एक सबल आणि समृद्ध राष्ट्राची अपेक्षा होती, ज्यासाठी एक समर्थ आणि शक्तिने युक्त असलेल्या नविन पीढीची गरज होती, म्हणून शक्ति उपासना सुरु झाली.ज्या शक्ति उपासनेमध्ये सूर्यनमस्कारांना विशेष महत्व होते, कारण स्वत: समर्थ १२०० सूर्यनमस्कार घालत.
आणि आजही हे विचार तेवढेच महत्वपूर्ण आहेत जेवढे त्यावेळी होते, कारण सगळ्या गोष्टी केवळ मजेतआणि हसण्यात घेणा-या या पीढीने प्रत्येक उत्सव त्याच महत्व शास्त्र समजून घेऊन ते साजरे करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण अज्ञानाच्या स्वैर सागरात बुढणारी ही ज्ञानरूपी नौका पुन्हा किनारी लावायची असेल तर आपणास आपली पुराणातील सुधारीत गलबत घेऊन पुन्हा उतरावे लागणार. कारण "शास्त्र" हे दुधारी शस्त्र आहे , ज्याचा वापर महत्वचा आहे आणि आपणास तेच समजल पाहीजे.
शक्ति आणि बुद्धि यांचा एकत्रित मेळ असलेल्या मारुती रायांचे स्मरण करुन पुन्हा एकदा ही पवित्र भूमी सुजलाम् सुफलाम् करण्याचा संकल्प आपण सोडूया हेच योग्य ठरेल.
||जय श्रीराम|| ||जय भारत||
-
No comments:
Post a Comment